मुस्लिम समाजाने देश व समाजाच्या हितासाठी १०० % मतदान करण्याची केली प्रतिज्ञा*

*मुस्लिम समाजाने देश व समाजाच्या हितासाठी १०० % मतदान करण्याची केली प्रतिज्ञा*

जळगाव जिल्हा रिपोर्टर-

*आबासाहेब सुर्यवंशी*

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आवाहनाला जळगाव मुस्लिम समाजाने पवित्र कार्य म्हणून संपूर्ण समाजने एकत्रित येऊन लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी देश व समाजाच्या हितासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील सदस्य व परिसरातील लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा व शंभर टक्के मतदान करणार व करून घेतील अशी प्रतिज्ञा काल मणियार वाडा येथे  घेण्यात आली.

*एमडीएफ चे राष्ट्रीय कार्याला प्रतिसाद*

महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट ही एक अराजकीय संघटना असून याद्वारे मुस्लिमच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने भारताची लोकशाही व संविधाना च्या सुरक्षितते साठीआपले मतदानाचे हक्क बजवावे त्यासोबत अशा व्यक्तींना मतदान करावे जे देश व समाजाच्या हितासाठी कार्य करणार आहे त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जळगाव येथे प्रत्येक मोहल्ला वाईज बैठका होत असून प्रत्येक मतदाराल मतदानाचे   महत्त्व विशद करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे अपील केलेले आहे त्याबाबत सुद्धा मतदारांना सामाजिक व धार्मिक उत्तरदायित्व म्हणून मतदान करा असे आव्हान करण्यात येत आहे.

*एम डी एफ चे समन्वयक*

एम डी एफ म्हणजे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट चे महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्यातील समन्वयक म्हणून मुफ्ती हारून नदवी व फारुक शेख अब्दुल्ला तर जिल्हा समन्वयक म्हणून आरिफ देशमुख हे कार्यरत आहे.

मनियार वाड्यातील मतदारांनी घेतली प्रतिज्ञा

रथ चौक ,कोळी पेठ येथील मन्यार वाड्यात मणियार बिरादरी, शिकलगर बिरादरी, खाटीक बिरादरी, पिंजारी बिरादरी व इतर बिरादरी अशी समिश्र वस्ती असून त्या ठिकाणी मोहल्ला समितीची बैठक मन्यार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चांद यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून त्यात महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट महाराष्ट्र चे फारुक शेख व जिल्हा संघटक आरिफ देशमुख यासह एमजेपीचे मेहमूद शेख  उपस्थित  होते त्यांच्या नेतृत्वात उपस्थित मतदारांनी  शंभर टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *